बापरे! बाबा वेंगांनी जसं सांगितलंय अगदी तसंच घडतंय

आतापर्यंत अनेकांनी विविध भविष्यवाण्या केल्या आहेत. (predictions)यामध्ये बल्गेरियाचे बाबा वेंगा हे फार प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अचूक भाकितांसाठी प्रसिद्ध असलेले बाबा वेंगा यांनी आजच्या काळाबाबत ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी अशा काळाचा संदर्भ दिला होता ज्यामध्ये मानव तंत्रज्ञानावर इतका अवलंबून राहील की तो त्यामुळे त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोहोचू शकते.

आपण पाहिलं तर आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही स्मार्टफोनमुळे होते. आजच्या काळात जेव्हा प्रत्येक हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता बाबा वेंगा यांची भाकितं पुन्हा खरी ठरणार असं म्हटलं जातंय.माणसाचं जीवन सुकर व्हावं यासाठी स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आलं.(predictions)मात्र सध्याच्या घडीला आपल्या हातात असलेला हाच स्मार्टफोन अनेक समस्यांचे मूळ बनलंय. त्याचा परिणाम अत्यंत चिंताजनक असून याचं प्रमाण लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये जास्त दिसून आलंय. नुकतंच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने केलेल्या एका अभ्यासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

या अभ्यासानुसार असं समोर आलंय की, सुमारे २४% मुलं झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करतात. मुख्य म्हणजे याचा थेट परिणाम मुलांच्या झोपेवर तसंच लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर होतो. इतकंच नाही तर मुलांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. (predictions)अपुऱ्या झोपेमुळे या मुलांमध्ये चिडचिडेपणा, थकवा जाणवत आहे.स्मार्टफोनचा जास्त प्रमाणात वापर केल्याने झोपेलाच नाही तर मानसिक आरोग्यालाही हानी पोहोचवते. मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या वाढत आहेत. मुलांचा स्क्रिन टाईम वाढल्यामुळे ती नीट खेळू शकत नाहीत किंवा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवू शकत नाहीत.

सध्याच्या काळात टेक्नॉलॉजीचा वापर चुकीचा नाही. मात्र आपण हा वापर किती प्रमाणात करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर याचं आपल्याला व्यसन लागलं तर ते प्रचंड धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाबा वेंगा यांनी ज्या धोक्याकडे इशारा दिला आहे तो आता समोर आलाय, असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला वेळीच जाणीव करून येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य या डिजिटल जगात हरवू नये याची काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा :

पोलीस हेड कॉन्स्टेबलबाबत गृह विभागाचा सर्वात मोठा निर्णय!

विराट-अनुष्काच्या मुलांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

 पाकिस्ताने भारतासमोर गुडघे टेकले! PM शाहबाज शरीफ शांततेसाठी भारताशी चर्चा करणार