राज्यात मागील तीन- चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. (weather)हवामान विभागाकडून काही जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार या अंदाजानुसार आज देखील राज्यातील अनेक भागात अवकाळीचा कहर पाहण्यास मिळाला आहे. वादळी वारा तसेच गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे मक्का पिकासह पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळनेर परिसरात मक्का पिक जमीनदोस्त झाले आहे. पावसासोबत आलेल्या वादळामुळे पपई चे झाडे तुटून पडल्यामुळे पपई पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे.

अकोला : अकोल्यात काल सायंकाळी आणि रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापूर, अकोला, आणि काहीशी पातूर तालुक्याला अवकाळीने झोडपून काढलं. जोराच्या वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट देखील सुरु होता. (weather)तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यात गारपिट झाली आहे. तर बाळापुर तालुक्यात निंबू, आंबा, कापणी करून ठेवलेला कांदासह अन्य फळबागांचं मोठं नुकसान झाले आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. जिल्ह्याच्या बहुतांश भागात गारा व जोरदार झालेल्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा भिजला. तर झाडाला लागलेल्या कैऱ्या तुटून पडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले. रोज होत असलेल्या पावसामुळे बळीराजाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
रायगड : रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात रात्री उशिरा अवकाळी पावसाने हजेरी लावली. दक्षिण रायगडच्या माणगाव, गोरेगाव, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यात मध्यम तर अलिबाग, पेण, मुरूड, खोपोली भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. (weather)जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. अखेरच्या टप्प्यातील आंबा पिकाचे पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील २४ तासात जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा :
घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्…Video Viral
महाराष्ट्रात आजही वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा