राज्यातील १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट! वीज पडून तरुणाचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील(districts) अंबाजोगाईमध्ये सोमवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने थैमान घातले. या अचानक आलेल्या हवामान बदलामुळे एका तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला, तर शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

5 मे 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात हवामानात अचानक मोठा बदल झाला. सुमारे 30 मिनिटांच्या मुसळधार पावसात मगरवाडी (ता. अंबाजोगाई) येथील 38 वर्षीय सचिन मधुकर मगर या तरुणाचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पावसामुळे अंबाजोगाई शहरातील नाले तुडुंब भरले, परिणामी रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारात दिवस काढावा लागत आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे लोकांनी दुकाने, टपऱ्या आणि इतर आडोश्यांमध्ये आसरा घेतला. गारपिटीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात बीड, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत(districts) वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये उष्ण आणि दमट हवामान असून दुपारी हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तापमान 30 ते 34 अंशांच्या दरम्यान राहील.

राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यात ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती आणि भंडारा यांचा समावेश आहे. तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम वगळता इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा :

धावत्या गाडीच्या छतावर बसून तरुणाचा धोकादायक स्टंट; अचानक तोल गेला अन्…, Video Viral

‘एक ऐवजी दोन चपटी प्या पण…’, परिवहन मंत्र्यांसमोर ST कर्मचाऱ्यांना गोगावलेंचा अजब सल्ला

आज सोन्याच्या दरात पुन्हा बदल; महाग झालं की स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे भाव