विद्यार्थ्यांनी मेहनतीचं सोनं केलं आहे! आज जाहीर (achieved)झालेल्या ICSE 10वी आणि ISC 12वी परीक्षेच्या निकालात महाराष्ट्राने जबरदस्त कामगिरी करत 99% पेक्षा अधिक टक्केवारी गाठली आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधील इश्मीत कौर आणि आरव बर्धन यांनी शंभर टक्के गुण मिळवून संपूर्ण राज्याच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत.शैक्षणिक जीवनातली ही यशाची पायरी नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर सध्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू असून, अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार केला जात आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत अतिशय दमदार कामगिरी केली आहे. ICSE दहावीचा एकूण निकाल 99.90 टक्के लागला, तर ISC बारावीचा निकाल 99.81 टक्क्यांवर पोहोचला. हा निकाल राज्यातील शिक्षणाच्या दर्जाची साक्ष देणारा आहे.
इश्मीत आणि आरव या दोघांनीही माध्यमांशी संवाद साधताना आपले यश नियमित अभ्यास, शिस्त आणि शिक्षक-पालकांच्या मार्गदर्शनाला दिले. “अभ्यासाचे तास नव्हे,(achieved) तर अभ्यासातील सातत्य महत्त्वाचं,” असं आरवने नमूद केलं. तर इश्मीतनेही अभ्यासात फोकस ठेवण्याचा मंत्र सांगितला.
देशभरात आयएससी 12वी परीक्षेसाठी 2803 शाळांमधील 2,52,507 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर ICSE 10वी परीक्षेत 1,460 शाळांमधून 99,551 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालांमध्ये मुलींनी पुन्हा एकदा आघाडी घेत 99.45 टक्के यश मिळवलं, तर मुलांनी 98.64 टक्क्यांची घवघवीत कामगिरी केली.(achieved)या निकालाने विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे मनोबल उंचावले असून, यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा :
मोठा घोटाळा ! कोल्हापूर जिल्हा बँकेत 3.21 कोटींचा अपहार
बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…
देशात होणार जातनिहाय जनगणना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचा मोठा निर्णय