शरद पवारांना मतदानानंतर 16 दिवसांनी विजयाची चाहुल लागली?

बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती, हे समीकरण जणू दृढ झालेलं.(winning) पण यंदा याच निवडणुकीत पवार विरुद्ध पवार रंगलेल्या सामन्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा बारामतीकडे वळल्यात.यंदाची लोकसभा निवडणूक  अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची आहे, विशेषतः महाराष्ट्रात. शिवसेनेतील बंडाळी आणि राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक निकालांकडे लागलं आहे

. अशातच निवडणुकीच्या घोषणेपूर्वीपासूनच महाराष्ट्रातील एका मतदारसंघाची जबरदस्त चर्चा रंगलेली. तो म्हणजे, बारामती मतदारसंघ  बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती, हे समीकरण जणू दृढ झालेलं. पण यंदा याच निवडणुकीत पवार विरुद्ध पवार रंगलेल्या सामन्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा बारामतीकडे वळल्यात. अशातच शरद पवारांनी बारामती लोकसभा निकालांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा(winning) अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 

खात्री असायला हरकत नाही : शरद पवार 

बारामतीत विजयाची खात्री आहे का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच व्हायचा नाही, पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही.” 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच; शरद पवारांचा दावा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा शरद पवारांनी केला आहे.(winning) राज्यातील एनडीएला जनता धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. एनडीएमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा समावेश आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांनी साथ सोडून भाजपसोबत गाठ बांधली आहे. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अशातच यावेळची लोकसभा निवडणूक ही काका-पुतण्यामधील प्रतिष्ठेची लढाई असल्याचं बोललं जातंय. सर्वाधिक चर्चा आहे ती, बारामतीच्या लोकसभा जागेची. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ही जागा लढवली होती. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या येथून खासदार असून त्याही रिंगणात आहेत. या जागेवर नणंद-भावजय यांच्यातील लढत राज्यातील हायव्होल्टेज लढत म्हणून पाहिली जात आहे. 

विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढणार? शरद पवार म्हणाले… 

लोकसभेप्रमाणेच विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “विधानसभेलाही महाविकास आघाडीनं एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला 288 जागा आहेत, त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल. लोकसभेला 48 जागाच होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष आहे… असं असतानाही आम्ही लहान जागा घेतल्यात. आम्ही जास्त जागांची अपेक्षा केली नाही. जादा जागा घेण्याची आणि त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती, पण आपण तिघंजण एकत्र यायचं, त्यामुळे या तिघांमधील सामंजस्य राखलं गेलं पाहिजे. हे सूत्र आम्ही सर्वांनी पाळलं.” 

दरम्यान, अजित पवारांनी थोरल्या पवारांची साथ सोडून भाजपप्रणित महायुतीसोबत गाठ बांधली. बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण महायुतीकडून कोण? अशा चर्चा रंगलेल्या. अशातच महायुतीनं मोठा डाव टाकत बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे बारामतीतील नणंद-भावजयमध्ये रंगलेली लढत चर्चेचा विषय ठरली. 

हेही वाचा :

कोल्हापूर; साखर उत्पादनात महाराष्ट्र नंबर वन, उत्तर प्रदेशालाही टाकले मागे

30 वर्षांपूर्वी मेलेल्या मुलीसाठी नवरा शोधतंय कुटुंब सत्य ऐकून थरथर कापाल

कोल्हापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग हटवलं; सांगली मनपाची कारवाई