वय वाढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. वय जसजसं वाढतं, तसतशी आपल्या शरीराची ताकद(young), त्वचेची लवचिकता आणि इम्युनिटी थोडी कमी होऊ लागते. पण चांगली गोष्ट ही आहे की, योग्य आहाराच्या मदतीनं आपण यावर थोडंफार नियंत्रण ठेवू शकतो.
40 शीत आल्यानंतर शरीराची जास्त काळजी आणि पोषणाची गरज असते. काही फळं अशी आहेत, जी रोज खाल्ली तर वाढत्या वय(young) जसं की त्वचेवरील सुरकुत्या, थकवा, चिडचिडेपणा हे उशिरा दिसतात. चला तर मग पाहूया अशी 5 फळं जी तुम्हाला तरुण आणि ताजंतवानं ठेवू शकतात.
1. संत्री – त्वचेला फ्रेश आणि टाईट ठेवण्यासाठी
संत्रं हे व्हिटॅमिन C चा खजिना आहे. यामुळे त्वचा टाईट राहते आणि सुरकुत्या लवकर येत नाहीत. त्यात असलेले फ्लेवोनॉइड्स आणि पोटॅशियम तुमचं रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. रोज एक संत्रं खाल्लं तरी त्वचेचा ग्लो टिकतो.
2. डाळिंब- लवचिक त्वचा आणि निरोगी हृदयासाठी
डाळिंबमध्ये पॉलीफेनॉल आणि अँथोसायनिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला लवचिक बनवतात आणि सांधेदुखी कमी करतात. व्हिटॅमिन C चा पुरवठा करून डाळिंब शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो आणि सुरकुत्या कमी करतं.
3. केळं – हाडं, मसल्स आणि मूडसाठी उत्तम
केळं हे पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 चं उत्तम स्रोत आहे. त्यामुळे ते हृदय, हाडं आणि मसल्ससाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय, व्हिटॅमिन B6 मूड स्विंग्स कमी करतं आणि सतत थकवा वाटू देत नाही. नैसर्गिक साखरमुळे दिवसभर उर्जा मिळते.
4. आव्होकाडो – हार्मोन्स आणि त्वचेसाठी सुपरफूड
आव्होकाडोमध्ये हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) असतात, जे हार्मोन्स बॅलन्स ठेवतात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात. फाइबरमुळे पचन सुधारते आणि व्हिटॅमिन ई मुळे त्वचा दीर्घकाळ तरुण दिसते.
5. पपई – पचन आणि डोळ्यांसाठी उत्तम
पपईमध्ये पपेन नावाचा एन्जाइम असतं, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते. त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन A आणि C असतं. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ली, तर शरीराला पोषण चांगल्या पद्धतीने मिळतात.
(Disclaimer – ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही घरगुती उपचार आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे. आरोग्याशी संबंधित माहिती स्वीकारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.)
हेही वाचा :
- काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याची सोडचिठ्ठी
- सावधान! राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
- महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’, पालिका निवडणुकीआधी कोणाला धक्का?