चेन्नई सुपर किंग्ज ला हवा तास विजयाचा सूर अजूनही गवसला नाहीये. ऋतुराज गायकवाडकडून धोनीकडे(Dhoni) कर्णधारपद गेल्यावर काहीतरी बदल होतील, विजय मिळेल असं वाटलं हॉट परंतु तसे झालेले दिसत नाहीये. चेन्नईचं आयपीएल 2025 मध्ये पराभवाचं सत्र सुरूच आहे. शुक्रवारी, 25 एप्रिल रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना 5 विकेटने पराभव पत्करावा लागला.

चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स संघाने पहिल्यांदाच विजय मिळवला. या सिजनमधील चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज हा सातवा पराभव आहे. या पराभवासोबत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. या पराभवानंतर, संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी(Dhoni) खूप संतप्त दिसत होता.
धोनीनुसार त्याचा संघ 15-10 धावा कमी करू शकला. चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 154 धावांवर सर्वबाद झाला. सनरायझर्सने 18.4 षटकांत 5 गडी गमावून 155 धावा करून सामना जिंकला. 13 व्या षटकात 4 बाद 114 धावा झाल्यानंतर, संघाने शेवटच्या सहा विकेट फक्त 40 धावांमध्ये गमावल्या.
धोनी सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला की, “मला वाटतं आम्ही सतत विकेट गमावत राहिलो आणि दुसरे म्हणजे, मला वाटलं की पहिल्या डावात विकेट थोडी चांगली होती. 155 (154) धावसंख्या योग्य नव्हती कारण ती जास्त टर्न होत न्हवती. हो, आठव्या, नवव्या किंवा दहाव्या षटकानंतर वेगवान गोलंदाजांसाठी ते दोन तर्फी झाले. पण त्यात असामान्य काहीही नव्हते. म्हणून मला वाटतं आम्ही थोडी चांगली फलंदाजी करू शकलो असतो. बोर्डवर आणखी काही धावा जोडता आल्या असत्या.”
हेही वाचा :
उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर
‘माझ्याच देशाने हल्ला केला’; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने उडाली खळबळ
नौदल आधिकाऱ्याची पत्नी हिमांशी नरवालबद्दल मोठी माहिती समोर, एल्विश यादवसोबत खास नातं!