पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी हल्लेखोरांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू(cricketer) दानिश कनेरिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानने हल्ला केल्याची कबुलीच असल्याचे म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये मंगळवारी, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला. या घटनेनंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्यासारखे कठोर निर्णय घेतले. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी हल्लेखोर दहशतवाद्यांचा उल्लेख ‘स्वातंत्र्यसैनिक’ असा केला.
त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि विशेषतः भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शांततामय पर्यटकांवर हल्ला करणाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणणे हे दहशतवादाचे समर्थन मानले जात आहे. याच वादग्रस्त विधानावर दानिश कनेरिया यांनी जोरदार टीका केली आहे.
माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू(cricketer) दानिश कनेरिया (जे स्वतःला श्रीराम भक्त म्हणतात) यांनी समाज माध्यम ‘एक्स’ वर पोस्ट केले. त्यांनी लिहिले, “जेव्हा पाकिस्तानचे उपपंतप्रधान दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणतात, तेव्हा ते केवळ अपमानजनक नाही, तर आपल्या देशानेच (पाकिस्तानने) हल्ला केला आहे, हे स्वीकारण्यासारखे आहे.”
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीही कनेरिया यांनी आपल्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “जर पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात नव्हता, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चिंता का व्यक्त केली नाही? लष्कराला हाय अलर्टवर का ठेवले? स्पष्ट आहे की तुम्हाला सत्य माहित आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देता आणि दहशतवादाला प्रोत्साहन देता,” असे त्यांनी ‘एक्स’ वर म्हटले होते.
हेही वाचा :
“या” लोकांनी आंबा खाल्ल्यास होईल नुकसान! तुम्हीही यादीत आहात का? वाचा सविस्तर!
नॉटी नॉटी…! स्वप्निल – सोनालीचं नवं गाणं, थेट शॉवरखाली रोमान्स, VIDEO VIRAL
ब्रेकअप करताच एक्स गर्लफ्रेंडचे प्रायव्हेट VIDEO व्हायरल, शेवटी तरूणीनं..