इचलकरंजीत ‘गाव चलो, वस्ती चलो’ अभियानात नागरिकांशी थेट संवाद; प्रकाश अण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वाअंतर्गत (organization)इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ‘गाव चलो, वस्ती चलो’ अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. हे अभियान आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आले.या अभियानाअंतर्गत प्रकाश अण्णा आवाडे यांनी गावभागातील दीपक राशीनकर, दत्तोपंत जोशी आणि विजय देवळे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांशी तसेच परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधला. संवादादरम्यान नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती(organization) मदत करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या वेळी भाजपा शहराध्यक्ष पै.(organization) अमृत मामा भोसले, माजी नगरसेवक मारुती पाथरवट, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नामदेव सातपुते, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस रमाताई फाटक, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, सहकार आघाडी अध्यक्ष अरुण कुंभार, सागर कचरे, अमर कांबळे, सचिन माळी, किशोर पाटील, सचिन कोरे, अशोक साळुंखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे भाजपचा जनतेशी थेट संपर्क वाढला असून, भविष्यातील कामकाजासाठी नवचैतन्य मिळाले असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात येत आहे

हेही वाचा :

‘एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा’; केंद्राचा राज्यांना इशारा

‘4’ संकेतांवरुन ओळखा चुकीचा जोडीदार निवडलाय; आधीच व्हा सावध, नाहीतर…

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर मंत्री नितेश राणेंच वादग्रस्त वक्तव्य