पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी(Pakistani) नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ओळख पटवून त्यांना ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत त्यांनी देश सोडणे बंधनकारक आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या निर्णयाची तातडीने आणि कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रतिसादाचा एक भाग आहे.
केंद्राच्या आदेशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस दलाला तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा. राज्यात असलेल्या संबंधित पाकिस्तानी(Pakistani) नागरिकांचा शोध घेऊन ते ४८ तासांत देश सोडून जात आहेत की नाही, यावर कडक नजर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.

ही प्रक्रिया शांततेत पार पाडावी आणि कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. गरज भासल्यास केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेने या हल्ल्याचा निषेध केला असून, प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी अमेरिका भारतासोबत असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा :
नौदल आधिकाऱ्याची पत्नी हिमांशी नरवालबद्दल मोठी माहिती समोर, एल्विश यादवसोबत खास नातं!
‘हे योग्य नाही…’, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?
कोल्हापूर : ‘ती’ गाडी आली अन् 10 वर्षांच्या मुलाला घेऊन गेली; पण ग्रामस्थांनी पाठलाग केला नंतर…