जशास तसे! पाकिस्तानातील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त- सोफिया कुरेशी

गेल्या तीन दिवसांपासून भारत- पाकिस्तान(Pakistan) सीमेवरील हल्ले सातत्याने सुरूच आहेत. आज पहाटेही पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले. तर भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील(Pakistan) सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त केला. तर पाकिस्तानकडून 26 ठिकाणी हल्ले कऱणयात आले, अशी माहिती लेफ्टनंट कमांडर सोफिया कुरेशी यांनी दिली. संरक्षण मंत्रालया आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भारताकडून उत्तरादाखल करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्याचे त्यांनी फोटोही प्रसिद्ध केले.

सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाया होत आहेत. तर भारताने त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आज पहाटे झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानने जड शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानने क्षेपणास्त्राने हल्ला केला. पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला. कर्नल सोफिया म्हणाल्या की, पाकिस्तानचा दृष्टिकोन बेजबाबदार आहे.

आंतरराष्ट्रीय सीमा आणि श्रीनगर पासून नलियापर्यंत २६ हून अधिक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले पण भारतीय लष्कराने हे हल्ले हाणून पाडले. तरीही वायुसेनेच्या तळावर सियालकोट उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भूज, भटिंडा स्टेशन या ठिकाणी भारतीय लष्करानेही हल्ले केले.

पाकिस्तानने(Pakistan) १.४० मिनिटांनी हायस्पीड मिसाईलचा वापर करून पंजाबचे हवाईस्थळाला लक्ष्य कऱण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, उधमपुर येथील रुग्णालये आणि शाळांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे नागरी स्थळांना लक्ष्य कऱण्याचा पाकिस्तानचा हेतू उघड झाला. पण त्यावरही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत त्यांचे हल्ले परतून लावले.

पाकिस्तानच्या या हल्लयानंतर पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करत आहे. एस ४००, ब्रह्मोसचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि पाकिस्तानचा(Pakistan) दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट प्रचार आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान पुढच्या भागात सैन्य तैनात करत आहे. विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, पश्चिम सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे.

लोइटरिंग अम्युनेशन ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. तसेच अनेक उच्च दर्जाच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यांनी केलेले बहुतेक हल्ले पंजाबला लक्ष्य करून करण्यात आले. पाकिस्तानने नागरी ठिकाणांनाही लक्ष्य केले. याशिवाय पाकिस्तानने चुकीची माहिती मोहीम सुरू केली. त्यांच्याकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दल खोट्या कथाही सांगितल्या जात आहेत.

हेही वाचा :

चढलेली उतरवण्यासाठी प्रसिद्ध होतेय ‘ही’ ड्रिंक

टीम इंडियाला धक्का! विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

विमानप्रवाशांसाठी धक्कादायक बातमी! भारतातील ३२ विमानतळ बंद