इचलकरंजी – कोल्हापूर(Kolhapur) जिल्हा माहेश्वरी सभा, माहेश्वरी सभा आणि माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीने जयसिंगपूर येथे ‘संघटन तुमच्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी, प्रदेशमंत्री सत्यनारायण सारडा, उपाध्यक्ष दिनेश सोमाणी, सह मंत्री मनमोहन कासट,जनसंपर्कमंत्री ओमप्रकाश तापड़िया माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबानी, भिकुलाल मर्दा, शांतिकिशोर मंत्री , द्वारकाधीश सारडा , रामगोपाल मालानी , संजय सारडा,बनवारीलाल झंवर , श्री गोपाल दरगड उपस्थित होते. स्वागत जयसिंगपूर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बलदवा यांनी तर प्रास्ताविक कोल्हापूर(Kolhapur) जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केले.
जिल्हा सभेचे माझी अध्यक्ष श्रीकांत मंत्री यांनी प्रदेशाध्यक्षांची ओळख करून दिली. या संवाद दौऱ्यात महासभा आणि सभेच्या विविध योजनांची माहिती देताना प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी, प्रत्येक पदाधिकाऱ्याला काम करावे लागेल. केवळ अध्यक्ष एकटा सर्व कामे करू शकत नाहीत. त्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे त्यांनी ते काम आपली जबाबदारी म्हणून करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नियोजन जयसिंगपूरचे लक्ष्मीकांत बलदवा, दीपक बियाणी, राजकुमार बलदवा, दिलीप बजाज, विपीन बियाणी ,शैलेष लोया, मेघराज बलदवा,गजाधर मांधनिया, घनश्याम जी मांधनिया यांनी केले.
यावेळी कोल्हापूर, जयसिंगपूर आणि इचलकरंजी येथील जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हा सभा सचिव लालचंद गट्टाणी आणि तालुका सचिव विपिन बियाणी यांनी सहकार्य केले. दीपक बियाणी यांनी आभार मानले.
हेही वाचा :
उन्हाळ्यात स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या
घोड्यांमुळे वाचला 28 कोल्हापूरकरांचा जीव; नेमकं घडलं काय जाणून घ्या
डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्ये मागे गृहकलहच सूनेनेच दिली होती ही धमकी