शब्दाचे एकदम पक्के असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक

अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या लोकांना आपला स्वाभिमान फार प्रिय असतो.(words) जे बोलतात ते करुन दाखवण्याची वृत्ती यांच्यात असते आणि तसं करता आलं नाही तर यांना चैन पडत नाही.अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 9 असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य खूप खास आहे.

मूलांक 9 हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. या मूलांकाचे  लोक त्यांच्या म्हणण्यावर खरे उतरतात. हे लोक मरेपर्यंत आपला शब्द पाळतात. या लोकांना कुणासमोर झुकणं आवडत नाही. हे लोक धाडसी आणि निर्भयी देखील असतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक 9 च्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. या मूलांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मरेपर्यंत वचन पाळतात

अंकशास्त्रानुसार, 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक प्रचंड हट्टी असतात,(words)ते त्यांच्या शब्दांवर खरे उतरतात. हे लोक मरेपर्यंत दिलेला शब्द पाळतात. हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात. तसेच, ते निडर आणि धैर्यवान असतात. या लोकांना त्यांच्या स्वतःच्या जिद्दीवर कमाई करणं आवडतं. हे लोक कोणाच्याही दबावाखाली काम करत नाहीत. त्याचबरोबर ते कोणतंही काम अशक्य मानत नाहीत.

दूरदर्शी आणि स्वाभिमानी असतात

मूलांक 9 चे लोक स्वाभिमानी आणि दूरदृष्टी असतात. या लोकांना त्यांचा स्वाभिमान खूप प्रिय असतो. त्यांची कोणी फसवणूक केली तर त्यांना ते धडा शिकवूनच राहतात. याशिवाय हे लोक स्पष्टवक्तेही असतात आणि त्यांना मोकळेपणाने बोलायला यांना आवडतं. तसेच हे लोक वर्तमानावर विश्वास ठेवतात.

पटकन येतो राग

मूलांक 9 च्या लोकांना थोडा लवकर राग येतो, ज्यामुळे लोकांशी त्यांचे संबंध बिघडतात. या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टीचाही पटकन राग येतो. एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात. एखाद्या माणसाचं बोलणं, वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खावून येतात. या लोकांचा स्वभावच मूळात तापट (words)असतो, त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

शिस्तीचे असतात पक्के

अंकशास्त्रानुसार, 9 मूलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला आवडतं. त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते त्या समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात.

हेही वाचा :

कोल्हापूर; साखर उत्पादनात महाराष्ट्र नंबर वन, उत्तर प्रदेशालाही टाकले मागे

30 वर्षांपूर्वी मेलेल्या मुलीसाठी नवरा शोधतंय कुटुंब सत्य ऐकून थरथर कापाल

कोल्हापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग हटवलं; सांगली मनपाची कारवाई