जर तुम्ही फक्त 10 दिवसांसाठी धूम्रपान सोडले तर शरीरात दिसतात ‘हे’ 5 बदल

धुम्रपान केल्याने केवळ फुफ्फुसाचे आरोग्य धोक्यात येत नाही(changes) तर तर हळूहळू संपूर्ण शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामध्ये असलेले निकोटीन, टार आणि इतर हानिकारक रसायने रक्तप्रवाह, हृदय, मेंदू, त्वचा आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात. सतत धूम्रपान केल्याने श्वसनाच्या समस्या, हृदयरोग, स्ट्रोक, कर्करोग आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे यासारख्या गंभीर आजार उद्भवू शकतात.ही सवय शरीराच्या नैसर्गिक क्षमतांसाठी घातक ठरू शकते. तसेच अनेक लोकांचा जीव देखील गमवावा लागला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही फक्त 10 दिवस धुम्रपानापासून दूर राहिलात तर तुमच्या शरीरात काही पुढील काही चांगले बदल दिसू शकतात.

क्षमता वाढू शकते
निकोटीन तुमची चव आणि वासाची भावना कमी करते. (changes)धूम्रपान सोडल्यानंतर काही दिवसांतच जीभ आणि नाकाची संवेदनशीलता परत येऊ लागते. दहा दिवसांत तुम्हाला अन्नाची चव आणि फुलांचा वास चांगला येऊ शकेल.

श्वास घेणं सोपे होईल
व्हिनेगर प्यायल्याने तुमच्या फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम होतो. सिगारेटमध्ये असलेले टार आणि इतर रसायने फुफ्फुसांमध्ये जमा होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. पण धूम्रपान सोडल्यानंतर काही दिवसांतच तुमचे फुफ्फुस स्वच्छ होऊ लागतात. दहाव्या दिवसापर्यंत, तुम्हाला श्वास घेण्यास आराम वाटू लागेल आणि तुमच्या छातीतील जडपणा कमी होईल.

रक्तदाबाचा त्रास कमी
धुम्रपान केल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब असंतुलित होतो. यामुळे हृदयावर दबाव वाढतो. परंतु धूम्रपान सोडल्यानंतर काही तासांतच हे परिणाम कमी होऊ लागतात (changes)आणि दहा दिवसांत हृदयाचे कार्य सामान्य होण्यास सुरुवात होते. तसेच हृदयासंबंधित समस्या कमी होतात.

ऊर्जा वाढेल
निकोटीन शरीराची ऊर्जा कमी करते. जेव्हा तुम्ही धुम्रपान करत नाही तेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. दहा दिवसांत तुम्हाला अधिक सक्रिय आणि उत्साही वाटू लागते. चालताना, धावताना आणि पायऱ्या चढताना कमी थकवा येतो.

त्वचा चमकादार दिसते
धूम्रपानामुळे त्वचा निस्तेज होते. धुम्रापान सोडल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला पोषण मिळू लागते. दहा दिवसांत त्वचा थोडीशी उजळ आणि फ्रेश दिसू लागते. म्हणून जर तुम्ही धूम्रपान सोडण्याचा विचार करत असाल तर फक्त 10 दिवस असे नक्की करून पाहा तुम्हाला सकारात्मक बदल दिसेल.

हेही वाचा :

भारत-पाकिस्तान तणावामुळे सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय!

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, ‘या’ ट्विटमुळे आला अडचणीत

घटस्फोटानंतर समांथाच्या आयुष्यात नवी चाहूल? विवाहित दिग्दर्शकाशी जडले प्रेमसंबंध?