काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड(country) दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात एकामागून एक कडक निर्णय घेतले असून, आता याचे पडसाद क्रिकेट विश्वातही उमटायला सुरुवात झाली आहे.BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कडून यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पहलगाम हल्ल्यावर तीव्र दु:ख व्यक्त करताना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांबाबत सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

राजीव शुक्ला म्हणाले, “भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिकांसंदर्भात निर्णय हा पूर्णतः केंद्र सरकारच्या धोरणावर आधारित असतो. सध्या सरकार पाकिस्तानसोबत कोणताही द्विपक्षीय संपर्क ठेवण्याच्या मूडमध्ये नाही आणि त्यामुळे आम्हीदेखील त्या निर्णयाचे पालन करत आहोत.”त्यांनी (country) स्पष्ट केलं की, “फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अनिवार्य सहभागामुळे आम्ही पाकिस्तानसोबत खेळतो, त्यापलीकडे कोणतीही मालिका सध्या शक्य नाही.”

भारत आणि पाकिस्तानमधील शेवटची द्विपक्षीय मर्यादित षटकांची मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच सामने खेळवले जात आहेत, जसं की 2023 च्या एकदिवसीय
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीसीएस कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ची आपत्कालीन बैठक झाली. या बैठकीत सिंधू पाणी करार थांबवणे, (country) पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद करणे यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे, क्रीडा आणि संस्कृती यामधील पाकिस्तानी सहभागावर आता अजून कठोर भूमिका घेतली जात आहे.
हेही वाचा :
बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…
अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’
हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक
केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ