काही लोकं जेवताना पाणी पितात,(drink) तर काही जणं जेवण्यापूर्वी पाणी पितात. इतकंच नाही तर काहींना जेवणानंतरही पाणी प्यायची सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?

30 मिनिटांनी प्यावं पाणी
आयुर्वेदात म्हटल्यानुसार, तुम्हाला जेवणापूर्वी कमीत कमी २०-३० मिनिटं आधी पाणी प्यायलं पाहिजे. जर तुम्ही जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी पीत असाल तर तुमच्या पचनक्रियेवर त्याचा वाईट परिणाम होत नाही. म्हणजेच तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे जेवणानंतर लगेच (drink)पाणी पिणं टाळावं.
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होतं?
खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास त्याचा तुमच्या गट हेल्थवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच जेवल्यानंतर तातडीने पाणी प्यायल्यास तुमच्या पचनक्रियेची प्रोसेस हळू होते. त्यामुळे आयुर्वेदात खाल्लानंतर लगेच पाणी पिऊ नये.

या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या
आयुर्वेदानुसार, जेवत असताना तुम्ही अन्न योग्य(drink) पद्धतीने चावलं पाहिजे. जर तुम्ही मोठे घा, घेऊन पटापट गिळत असाल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे गट हेल्थवर परिणाम होत असून इतर पोटाच्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. जेवणाचं योग्य पद्धतीने पचन हवं असल्यास झोप आणि जेवणामध्ये २-३ तासांचं अंतर ठेवावं.
हेही वाचा :
बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…
अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’
हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक