उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

राज्यात उष्णतेचा(heat) प्रकोप प्रचंड वाढत चालला आहे. दुपारच्या वेळेत तापमानात प्रचंड वाढत चालले आहे. त्यामुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात तापमानात मोठी वाढ होईल असा इशारा आधीच देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून या महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे.

मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील नागरिकांना सुद्धा उष्णतेच्या(heat) लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

विदर्भात सध्या उष्णता प्रचंड वाढली आहे. चंद्रपूर सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 45.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपुरी या शहरांतही तापमानाने 45 अंशांपर्यंत मजल गाठली आहे. या दिवसांत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम विदर्भासह पूर्व भागातील शहरांत तापमानात वाढ होणार आहे. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत पारा वाढणार आहे. या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरी बनवा थंडगार गुलाब कुल्फी

शिकूनही ‘हे’ 4 लोक ठरतात मुर्ख; पाठीमागे उडवली जाते खिल्ली

‘औकातीत राहा…’ गरोदर कियाराच्या कारला घेरल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा भडकला, रस्त्यावरच… VIDEO