भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि सध्या टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी(Threat) मिळाली आहे. आयएसआयएस काश्मीरकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात गौतम गंभीर यांनी तत्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क करून तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाच्या सुरक्षिततेची मागणी करण्यात आली आहे.

याआधी गौतम गंभीरने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला होता. भारत या भ्याड हल्लाला सडेतोड उत्तर देईल. या कृत्यासाठी जे लोक जबाबदार असतील त्यांना त्यांच्या या कृत्याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराही गंभीरने दिला होता. या हल्ल्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर गौतम गंभीरला धमकी(Threat) आल्याने खळबळ उडाली आहे.
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Former BJP MP and current head coach of the Indian cricket team, Gautam Gambhir, received a death threat from 'ISIS Kashmir'. On Wednesday, he approached the Delhi Police, filing a formal complaint for an FIR and seeking measures to safeguard his family’s security: Office of… pic.twitter.com/MEG26UIwFh
— ANI (@ANI) April 24, 2025
या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. हल्लेखोरांत दोन अतिरेकी पाकिस्तानी असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीयांत पाकिस्तानविरुद्ध संताप उफाळून आला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सीसीएस बैठकीत पाकिस्तानचं कंबरडं मोडणारे निर्णय घेण्यात आले. यानंतर काही वेळातच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आयोजित केली. ही बैठक आज होणार आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरी बनवा थंडगार गुलाब कुल्फी
शिकूनही ‘हे’ 4 लोक ठरतात मुर्ख; पाठीमागे उडवली जाते खिल्ली
उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट