6 मे रोजी रात्री भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी स्थळांवर हल्ला केला. या हल्ल्याचा परिणाम आता भारतासह जागतिक शेअर बाजारात(stock market) देखील पाहायला मिळणार आहे.

6 मे रोजी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर 7 मे रोजी सकाळी शेअर बाजारावर(stock market) परिणाम झाला आहे. शेअर बाजाराची सुरु होताच निफ्टीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. भारताने केलेल्या या हल्ल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
निफ्टी निर्देशांकही घसरला आणि सुमारे 80 अंकांच्या घसरणीसह 24350 वर व्यवहार करत आहे. भारताने केलेल्या हल्ल्याचा परिणाम केवळ भारतीय शेअर बाजारतच नाही तर जागतिक बाजारपेठेत देखील झाला आहे. या हल्ल्यानंतर जागतिक बाजारापेठेत मोठी हालचाल दिसून येत आहे.
जपानचा निक्केई निर्देशांक स्थिर आहे. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 1.3% च्या वाढीसह व्यवहार करत आहे. चीनच्या शांघाय कंपोझिट निर्देशांकातही अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्येही वाढ पाहायला मिळत आहे. दोन दिवसांनंतर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात विक्री दिसून आली. सेन्सेक्स 155 अंकांनी घसरून 80641 वर बंद झाला. निफ्टी देखील 81 अंकांनी घसरून 24379 वर बंद झाला.
हेही वाचा :
गुडघ्यांवर बसून मुस्लीम अभिनेत्री शंकराच्या मंदिरात पोहोचली, VIDEO तुफान व्हायरल
नरेंद्र मोदींना पहलगाम हल्ल्याची माहिती आधीच मिळाली होती…?: खर्गेंचा खळबळजनक दावा
सिद्धार्थ-कियाराच्या अंदाजात आणखी एका कपलने दिली गुडन्यूज, शेअर केला हटले फोटो!