कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कोतोली गावचा सुपुत्र आणि सध्या जम्मू-काश्मीर पोलिस दलात डोडा, किश्तवाड व रामबन परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी श्रीधर पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली तीन खतरनाक आणि मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा(terrorists) यशस्वी खात्मा केला आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्राची, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

पाच दिवस सलग सुरू असलेल्या या संयुक्त सर्च ऑपरेशनमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य व सीआरपीएफ या दलांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. घनदाट जंगल, डोंगराळ भाग, जोरदार थंडी, बर्फवृष्टी आणि सततचा जीवघेणा धोका अशा प्रतिकूल परिस्थितीतही हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले गेले.
ही कामगिरी केवळ तिन्ही अतिरेक्यांचा खात्मा नसून, त्यांनी आखलेला मोठा दहशतवादी(terrorists) कटही हाणून पाडण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अतिरेकी लवकरच भारतीय सैन्यावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. यापूर्वीही त्यांनी अनेक जवानांना निशाणा बनवले होते.

DIG श्रीधर पाटील यांचं नाव जम्मू-काश्मीरमधील सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वासाचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक बनलं आहे. “पाटील साब है ना, तो फिक्र नही” अशी भावना स्थानिक जनतेमध्ये त्यांच्या नेतृत्वावरून निर्माण झाली आहे.
DIG श्रीधर पाटील म्हणाले, “प्रतिकूल हवामान आणि कठीण भूभागातही आमचं ऑपरेशन चालूच राहील. शेवटचा अतिरेकी संपेपर्यंत आम्ही थांबणार नाही. हा लढा आम्ही जिंकणारच.” श्रीधर पाटील यांच्या या शौर्यगाथेने केवळ पोलिस दलातच नव्हे, तर देशभरातून त्यांचं जोरदार कौतुक होत आहे.
हेही वाचा :
गुडघ्यांवर बसून मुस्लीम अभिनेत्री शंकराच्या मंदिरात पोहोचली, VIDEO तुफान व्हायरल
नरेंद्र मोदींना पहलगाम हल्ल्याची माहिती आधीच मिळाली होती…?: खर्गेंचा खळबळजनक दावा
सिद्धार्थ-कियाराच्या अंदाजात आणखी एका कपलने दिली गुडन्यूज, शेअर केला हटले फोटो!