बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते केवळ कॅमेऱ्यासमोरच नव्हे तर कॅमेऱ्यामागेही आपली छाप सोडून गेले आहेत. अभिनयातून प्रचंड लोकप्रियता मिळवूनही काही कलाकारांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत स्वतःला नव्या रूपात सादर केलं. प्रेक्षकांसाठी ही नेहमीच उत्सुकतेची बाब ठरली आहे की पडद्यावर झळकणारा त्यांचा आवडता अभिनेता जेव्हा कथा सांगण्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेतो तेव्हा तो काय कमाल करतो.

अभिनयात रोमँटिक हिरो म्हणून ओळख असलेले ऋषी कपूर यांनीही दिग्दर्शनाचा अनुभव घेतला होता. 1999 साली प्रदर्शित झालेल्या आ अब लौट चलें या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शकाची भूमिका निभावली. (Bollywood) या चित्रपटात अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय प्रमुख भूमिकेत होते. मात्र या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळण घेतले नाही. ऍक्शन हिरो म्हणून ओळख असलेले सनी देओल यांनी 1999 साली दिल्लगी या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉबी देओल आणि उर्मिला मातोंडकर झळकले होते. त्यानंतर त्यांनी घायल वन्स अगेन या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले आमिर खान यांनीही दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. 2007 मध्ये आलेल्या तारे जमीन पर या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली. मुलांमधील डिस्लेक्सिया या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अरबाज खान यांनी दबंग 2 या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवले. या चित्रपटात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत होते. ‘दबंग’ मालिकेच्या यशानंतर त्यांनी कॅमेऱ्यामागे काम करत दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली.

अभिनेता अजय देवगण यांनी 2008 साली यू, मी और हम या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.(Bollywood) या चित्रपटात त्याच्यासोबत काजोल मुख्य भूमिकेत होती. पुढे त्यांनी शिवाय या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी 2002 साली ओम जय जगदीश या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला. या चित्रपटात अनिल कपूर, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन यांच्या भूमिका होत्या. तसंच प्रभावी अभिनयासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर यांनी 1991 साली प्रहार या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात त्यांनी लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती आणि माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत झळकली होती.

अशा प्रकारे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी केवळ अभिनयापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता दिग्दर्शन क्षेत्रातही आपली क्षमता सिद्ध केली.(Bollywood) काहींना मोठे यश मिळाले, तर काहींनी एक-दोन चित्रपटांनंतर पुन्हा अभिनयाकडेच लक्ष केंद्रित केले. मात्र त्यांच्या या प्रयत्नांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला वेगळ्या दृष्टीकोनातून कथन करण्याची संधी मिळाली,

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *