भारताने पुन्हा एकदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. रविवारी न्युझीलंडला हरवून भारत पुन्हा , सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. मात्र या मॅचनंतर मोहम्मद सिराजच्या व्हिडीओची एक छोटीशी क्लिप व्हायरल झाली असून तो जे बोललाय, त्यावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे. असं काय आहे त्या व्हिडीओमध्ये

काल, 8 मार्चचा दिवस हा भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अविस्मरणीय होता. आत्तापर्यंत कोणीच केलं नाही, असं काम भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवलं. काल रात्री, भारतीय संघानेT20 वर्ल्ड कप फायनल जिंकून एक अतुलनीय विक्रम प्रस्थापित केला. भारतीय संघ तीन वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनला आहे. एवढंच नव्हे तर घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ आणि सलग दोन T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा विक्रमही आता भारताच्याच नावे आहे. हे सगळं तर तुम्ह आततापर्यंत वाचलंच असेल, कळंलही असेल. (India) पण आता अशी गोष्ट जाणून घेऊया, जी बऱ्याच जणांना माहीत नसेल. भारताचा खेळाडू,उत्तम गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ आता व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे, असं काय आहे त्या व्हिडीओत ?
काल रात्री अंतिम सामना जिंकून T20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर टीम इंडियातील वेगवेगळ्या खेळाडूंच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता कसं वाटतंय, काय भावान आहेत हे अनेकांना विचारण्यात आलं. याचदरम्यान, भारतीय संघातील गोलंदाज, मोहम्मद सिराजला विचारण्यात आलं की, प्लेइंग 11 मधून बाहेर असल्याने, भारताच्या विजयात त्यानं आणि कुलदीप यादवचं काय योगदान दिलं? हा प्रश्न ऐकून त्याने जे उत्तर दिलं ते खरंच ऐकण्यासारखं होतं. सिाज म्हणाला, ‘हो, आमची (विजयात) भूमिका खूप मोठी आहे कारण आम्हाला बाहेर बसून गोलंदाजांना पाणी पाजावं लागलं.’ बास हा व्हिडीओ इथेच कट करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय पण एवढीशी क्लिपही खूप व्हायरल झाली आहे. मजेमजेत दिलेलं त्याचं हे उत्तर खूप व्हायरल झालंय.
पण तुम्ही आत्ताच जो व्हिडिओ पाहिला, तो तर व्हायरल होत असलेल्या मुलाखतीमधला छोटा भाग, छोटीशी क्लिप आहे. त्यानंतर या अकाउंटवर संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मोहम्मद सिराजने या प्रश्नाचं पूर्ण उत्तर काय दिलं ते स्पष्ट दिसलं आहे. ” संघाच्या बाहेर बसणं, ही देखील खूप मोठी भूमिका असते. कारण लोकांना पाणी देणे, नेटमध्ये गोलंदाजी करणे, सकारात्मक संघाचे वातावरण राखणे आणि नेहमी संघाला प्राधान्य देणे. (India) या सर्व गोष्टी संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान देतात. कोणत्याही वैयक्तिक ध्येयापेक्षा संघाचे ध्येय अधिक महत्त्वाचे असते.” असं त्याने सांगितलं. संघात समावेश व्हावा अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, पण टीम कॉम्बिनेशनमुळे बाहेर बसावं लागू शकतं, कारण संघ हा सर्वात महत्वाचा असतो, असंही सिराजने नमूद केलं.
सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत असलेली ही छोटी क्लिप पाहिल्यानंतर लोकांनी (India) त्यावर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. ” एखाद्याला पाणी देणं हे खूप चांगलं, शुभ, पुण्याचं काम आहे “, असं एकाने लिहीलं. तर “मित्रा, आजकाल इतके खरं कोण बोलतं ?” असा सवाल एका युजरने विचारला. “विचारपूर्वक कमेंट करा मित्रांनो. डीएसपी साहेब तुम्हाला तुरुंगात घेऊन जातील आणि काठीने मारतील.” अशी मजेशीर कमेंटही एका युजरने केली आहे.
हेही वाचा :
ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या
अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा