राज्यातील सर्व शिक्षकांसाठी(teachers) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने तातडीने नवीन सूचना जारी केल्याने अनेक शाळांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल शिक्षण मोहिमेला गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘विद्या समीक्षा केंद्र’ या हजेरी प्रणालीची अंमलबजावणी राज्यभरात अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता विभागाने थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे.VSK हजेरी प्रणाली शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सर्व शाळांसाठी अनिवार्य करण्यात आली होती. विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची दररोजची उपस्थिती अचूक आणि वेळेवर नोंदवण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची मानली जात होती. मात्र, अनेक शाळांकडून याचे पालन होत नसल्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील अनेक ग्रामीण व अर्ध-शहरी भागांमध्ये इंटरनेट सुविधा मर्यादित असल्याने आणि शिक्षकांमध्ये तांत्रिक ज्ञानाचा अभाव असल्याने VSK प्रणालीचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. हजारो शाळांनी अजूनही विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती वेळेवर नोंदवलेली नाही. त्यामुळे शिक्षण (teachers)विभागाने सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील महिन्यात प्रत्येक शाळेच्या VSK हजेरी प्रणालीचे दैनिक मूल्यांकन होणार आहे. ज्या शाळांची नोंदणी सातत्याने कमी असेल, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये आता VSK नोंदणीबाबत हालचाली वाढल्या आहेत.
या निर्णयावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच शिक्षकांवर विविध शालेय उपक्रम, परीक्षा, अहवाल आणि सरकारी नोंदींचा प्रचंड ताण असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. त्यातच आता डिजिटल हजेरीची सक्ती केल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असेही संघटनांचे मत आहे.संघटनांनी राज्य सरकारकडे VSK प्रणालीसाठी अतिरिक्त सहाय्यक कर्मचारी, उत्तम इंटरनेट सुविधा, आणि स्वतंत्र प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. “सुविधा दिल्याशिवाय जबाबदाऱ्या टाकणे अन्यायकारक आहे,” असे शिक्षक संघटनांचे ठाम मत आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने मात्र स्पष्ट केले आहे की VSK प्रणाली ही राष्ट्रीय शिक्षण आकडेवारी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. त्यामुळे सर्व शाळांनी वेळेवर आणि अचूक उपस्थिती नोंदवणे अत्यावश्यक असल्याचं विभागाने म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत नवीन हेल्पलाइन, तांत्रिक मार्गदर्शन सत्रे, आणि जिल्हानिहाय कार्यशाळा आयोजित करण्याची तयारीही शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.राज्यात VSK प्रणाली पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या सूचनांनंतर शिक्षक, शाळा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्यातील समन्वय किती प्रभावी राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीने एकत्र येत दिली गूडन्यूज
भाच्यासोबत खोलीत होती बायको, अचानक आला नवरा…
मराठी बोलता येत नाही का?’ विचारत ट्रेनमध्ये मारहाण