महाराष्ट्राच्या हवामानात सध्या अनोखे बदल घडत आहेत. राज्यातील अनेक भागात (Rain)ऊन कडक आणि तापमान जास्त असताना काही ठिकाणी पावसाचे ढग दाटले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात उन्हाबरोबरच पावसाचीही शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे लागणार आहे.
सध्या राज्यातील हवामानावर विविध चक्रीय वाऱ्यांचा परिणाम होत आहे. मध्य महाराष्ट्राच्या भागात समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच तमिळनाडू पासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुजरातकिनारपट्टीवर अरबी समुद्रातही चक्री वारे असल्यामुळे राज्यात ढगाळ हवामान तयार झाले असून, पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढील 24 तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रातील काही जिल्ह्यांमध्ये (Rain)हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळया भागात या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि प्रवासात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई, ठाणेआणि कोकणकिनारपट्टीवर आकाश स्वच्छ किंवा अंशतः (Rain) ढगाळ राहण्याची शक्यता आहे, मात्र पावसाची प्रचंड शक्यता नाही. पुणे, सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान स्थिर राहणार आहे, पण उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहील.अनियमित पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे शेतीवर परिणाम होण्याची भीती आहे. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सुचवले आहे की, पिकांचे योग्य नियोजन करावे आणि पावसामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी तात्पुरती उपाययोजना करावी. यामुळे काढणीला आलेली पिके सुरक्षित राहतील आणि शेतीस मोठा नुकसान टळेल.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *