राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू होऊन आता (scheme) जवळपास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळीच हा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत या वाढीबाबत कोणतीही अधिकृत अंमलबजावणी झालेली नाही.

मागील अर्थसंकल्पात या वाढीची घोषणा (scheme) होईल, अशी अपेक्षा लाभार्थी महिलांकडून व्यक्त केली जात होती. परंतु त्यावेळी योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यासंदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः राज्यातील लाखो महिलांना २१०० रुपयांच्या वाढीव हप्त्याची घोषणा होणार का, याची उत्सुकता आहे.
येत्या ६ मार्च रोजी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर (scheme) केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis सादर करणार आहेत. उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आली आहे. २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असून, सामाजिक कल्याण योजनांवर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी (scheme) अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, १५०० रुपयांचा हप्ता वाढवून २१०० रुपये करण्याबाबत स्पष्ट घोषणा होईल का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष ६ मार्चकडे लागले असून, अर्थसंकल्पातून त्यांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण