काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्वतःच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले होते. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. निवडणुका पार पडल्यानंतरही आता पुन्हा पक्षांतर होताना पहायला मिळत आहे.(BJP) काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्वतःच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर, काँग्रेसचे नेते गुलाबराव सपकाळ, काँग्रेसचे चिखली शहराध्यक्ष राहुल सवडतकर, चिखली पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद पालवे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अमोल काकडे, शेलोडीचे माजी सरपंच दिलीप नरवाडे, शिवव्याख्याते संतोष गवारे पाटील, विशाल सवडतकर, प्रदीप सवडतकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

महत्वाची बाब म्हणजे हा जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाच गृहजिल्हा आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे लोक भाजपासह अन्य पक्षांत जात असल्याने चिंता वाढली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत चिंताजनक बनत चालली आहे. त्यामुळे पक्षाची चिंता वाढली आहे.(BJP) या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आमदार श्वेताताई महाले, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपाचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगली कामगिरी करता आलेली नाही. पक्षाने मोजक्याच ठिकाणी विजय मिळवला होता. (BJP) त्याच बरोबर निवडणुकीपूर्वी पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केले होते. त्याचाच फटका पक्षाला निवडणुकीत बसलेला पहायला मिळाला.

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *