भारताच्या IT क्षेत्रातील सर्वात मोठी खळबळजनक घडामोड घडली आहे.(company) भारतातील सर्वात मोठी IT कंपनीन असलेल्या TATA ग्रुपच्या Tata Consultancy Services कंपनीने 80,000 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे कंपनीने फक्त 2 टक्के म्हणजे सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, 30,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते.

पुण्यातील एका टीसीएस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर कंपनीत सुरु असलेल्या घडमोडींवर भाष्य केले. टीसीएसमध्ये 13 वर्षे काम केल्यानंतर त्याला राजीनामा देण्यास सांगितले.(company) त्याच्याकडे असलेला एक प्रोजेक्ट संपल्यावर त्याला दुसरा प्रोजेक्ट देण्यात आला नाही. एचआर आणि आरएमजीने वारंवार फोन करून मला चौकशी केली पण कुणीच प्रतिसाद दिला नाही. माझ्यावर दुसऱ्या कंपनीत काम केल्याचा खोटा आरोपही करण्यात आला. शेवटी, मला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. मी नकार दिल्यावर, मला कामावरून काढून टाकण्यात आले असे तो म्हणाले.

अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले की कंपनी व्यवस्थापक “फ्लुइडीटी लिस्ट” तयार करतात ज्यामध्ये काढून टाकल्या जाणाऱ्यांची नावे असतात. ही यादी कौशल्यावर किंवा अनुभवावर आधारित नाही. (company) या यादीतील अनेक लोकांकडे आवश्यक कौशल्ये आहेत आणि ते मुलाखती उत्तीर्ण झाले आहेत, तरीही त्यांना प्रकल्प नाकारले जातात. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने स्पष्ट केले की जर तुमचे नाव त्या यादीत आले, तर तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्हाला कोणतेही काम मिळणार नाही. एचआर या कर्मचाऱ्यांना स्वतःहून राजीनामा देण्यास भाग पाडत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, FITE, UNITE आणि AIITEU सारख्या अनेक आयटी क्षेत्रातील संघटना उघडपणे असा दावा करत आहेत की TCS कर्मचाऱ्यांना अन्याय्यपणे काढून टाकत आहे. FITE सचिव प्रशांत पंडित यांनी सांगितले की निवृत्तीच्या जवळ असलेल्या 30-35 वर्षांच्या कर्मचाऱ्यांना अवघ्या 30 मिनिटांत काढून टाकण्यात आले. UNITE सरचिटणीस अलागुनाम्बी वेलकिन यांनी सांगितले की ज्यांच्याकडे अजूनही प्रकल्प होते अशा काही व्यक्तींना अन्याय्यपणे बेंचवर ठेवण्यात आले. (company) नंतर, जेव्हा त्यांनी नवीन प्रकल्पांची मागणी केली तेव्हा RMG आणि HR ने त्यांना त्यांच्यात सामील होण्यास नकार दिला.

जून 2025 मध्ये, टीसीएसने एक नवीन धोरण लागू केले जे प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातून किमान 225 दिवस बिल करण्यायोग्य (म्हणजेच प्रकल्पात सक्रिय) असणे आवश्यक आहे. असे न केल्यास रोजगारावर परिणाम होईल. शिवाय, कर्मचारी आता 35 दिवसांपेक्षा जास्त काळ बेंचवर राहू शकत नाहीत.(company) पूर्वी आरएमजीने प्रकल्प वाटप केले होते, परंतु आता कर्मचाऱ्यांना सर्व कामे करावी लागतात.टीसीएसने अद्याप या विषयावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, कारण कंपनी तिच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी मौन बाळगत आहे. सर्वांचे लक्ष आता 9 ऑक्टोबर रोजी आहे, जेव्हा कंपनी तिचे तिमाही निकाल जाहीर करेल आणि पहिल्यांदाच या वादाला उघडपणे तोंड देऊ शकेल.

हेही वाचा :

PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *