राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल जाणवत असून (warning) फेब्रुवारी महिन्यातच पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा मोठा इशारा दिला आहे. तापमानातील चढउतार आणि वाढलेला उकाडा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या उष्णता वाढत असून वातावरणात दमटपणा जाणवू लागला आहे, ज्यामुळे पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर , परभणी जालना , अहिल्यानगर , नंदूरबार, जळगाव , धुळे आणि नाशिक या आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कधी उकाडा तर कधी थंडी जाणवत (warning)असल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा प्रभाव जाणवला होता, मात्र त्यानंतर हळूहळू थंडी कमी होत गेली. 1 जानेवारीला झालेल्या पावसानंतर तापमानात सतत बदल होत असून फेब्रुवारी महिन्यात फारशी थंडी नसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला होता. दरम्यान, काही शहरांमध्ये वाढत चाललेले वायू प्रदूषणही चिंतेचा विषय ठरत आहे.पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत किमान आणि कमाल तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. किमान तापमान सुमारे 14 अंश सेल्सिअस (°C) तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके राहिले आहे.
त्यामुळे सकाळी आणि रात्री हलकासा गारठा जाणवत असला तरी (warning)सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे, असे हवामान विभागाने नमूद केले आहे. पुढील दोन दिवस हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे.मात्र दुपारच्या वेळेस कडक ऊन पडत असल्याने उकाडा वाढतो आहे, ज्यामुळे पुणेकरांना एका दिवसात जणू तीन ऋतूंचा अनुभव येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वातावरणातील सतत बदलांचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून सर्दी, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी