फेब्रुवारी 2026 मध्ये मंगळ आणि राहू यांची युती होत असून या संयोगातून (alliance)ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचा मानला जाणारा अंगारक योग तयार होणार आहे. हा योग काही राशींना अचानक बदल, मानसिक ताण, वाद-विवाद आणि निर्णयक्षमतेवर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे या काळात काही राशींनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला ज्योतिषतज्ज्ञ देत आहेत.ग्रहांच्या भ्रमणामुळे वेळोवेळी वेगवेगळे योग तयार होत असतात. काही योग शुभ फल देतात, तर काही योगांमुळे अडचणी वाढतात. अंगारक योग हा विशेषतः मंगळाच्या उग्र स्वभावामुळे आणि राहूच्या भ्रमात्मक प्रभावामुळे अस्थिरता निर्माण करणारा मानला जातो. फेब्रुवारी महिन्यात तयार होणारा हा योग तीन राशींवर अधिक प्रभाव टाकू शकतो, त्यामुळे या राशींच्या लोकांनी संयम, सावधगिरी आणि योग्य नियोजन ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिक अस्थिरतेचा ठरू शकतो. अचानक राग येणे, निर्णयांमध्ये घाई करणे किंवा नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे परिस्थिती हाताळणे आवश्यक ठरेल. आर्थिक व्यवहार करताना विशेष दक्षता घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

कर्क राशीच्या लोकांना या काळात मानसिक तणाव आणि कौटुंबिक (alliance)चिंता वाढू शकतात. घरगुती वाद, जुन्या गोष्टी उकरून काढल्या जाण्याची शक्यता तसेच आरोग्याबाबतही सतर्क राहण्याची गरज भासू शकते. भावनांच्या भरात निर्णय न घेता संयमाने विचार करून पावले उचलल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अंगारक योग अधिक आव्हानात्मक ठरू शकतो.(alliance) अचानक खर्च वाढणे, कायदेशीर वाद, कामात अडथळे येणे किंवा नातेसंबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चुकीचे निर्णय किंवा रागाच्या भरात बोललेले शब्द भविष्यात पश्चात्ताप देऊ शकतात, त्यामुळे विचारपूर्वक वागणे आवश्यक आहे.
या काळात कोणतेही मोठे निर्णय घेण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. तसेच ध्यान, योग, प्रार्थना यांसारख्या उपायांनी मानसिक स्थैर्य राखल्यास अंगारक योगाचे नकारात्मक परिणाम कमी करता येऊ शकतात, असे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी