कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी पुन्हा एकदा गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली प्रदूषणाची समस्या अद्यापही कायम असून नदीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक बनत आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झालेली दिसत आहे. नदीपात्र इतके जलपर्णीने व्यापले गेले आहे की, दूरून पाहिल्यास ते एखाद्या हिरव्यागार मैदानासारखे भासत आहे.

नदीच्या पाण्यावर दाट पसरलेल्या जलपर्णीवर पक्षी सहजपणे फिरताना दिसत असल्याने नदीतील पाण्याची स्थिती किती बिघडली आहे, याची प्रचिती येत आहे. जलपर्णीची अनियंत्रित वाढ ही नदीतील सेंद्रिय कचरा, सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषणाचे द्योतक मानली जाते. (pollution) त्यामुळे पंचगंगा नदीतील प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या परिसरातील नागरिकांनी पंचगंगा नदीतील प्रदूषणाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाही.(pollution) त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नदीची सध्याची अवस्था पाहता तातडीने उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी मानली जाते. शेती, पिण्याचे पाणी आणि स्थानिक पर्यावरण यासाठी ही नदी अत्यावश्यक आहे. मात्र वाढते प्रदूषण आणि जलपर्णीचा फैलाव यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (pollution) त्यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
हेही वाचा :
स्त्रीच्या ‘या’ अवयवाला चुकूनही स्पर्श करू नका, अन्यथा पश्चातापाची येईल वेळ
कानाची काळजी कशी घ्यावी? या चुकांमुळे येऊ शकतो बहिरेपणा