महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असून राज्यातील (alert)अनेक भागांत रविवारी मुसळधार पाऊस झाला. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत कोकणात मान्सून पोहचला आहे. यंदा मान्सून नेहमीच्या वेळेच्या तब्बल बारा दिवस आधीच कोकणात दाखल झाला आहे. त्यामुळे कोकणात सध्या जोरदार पावसाचा मारा सुरू असून, त्याचा परिणाम राज्याच्या इतर भागांवरही जाणवत आहे.

गेल्या आठवडाभरात पुणे, मुंबई, बारामती, सोलापूरसह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बारामतीमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला, तर सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि नीरेच्या खोऱ्यात मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे. नीरा नदीतून सध्या ३०,००० क्सूसेक पाणी(alert)भीमा नदी पात्रात सोडण्यात आल्याने पंढरपूर परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जुना ब्रिटीशकालीन पूल पाण्याखाली गेला असून, पुंडलिक मंदिर व अन्य मंदिरांनाही पाण्याचा वेढा पडला आहे.
मुंबईत रविवारी रात्रीपासून पाऊस सुरू असून, जे. जे. उड्डाणपुलावर पाणी साचले आहे. हवामान खात्याने पुढील दोन तास मुंबईत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यात पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले असून, शासकीय रुग्णालयातही पाणी साचले आहे.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या भरून वाहत आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(alert)सोलापूर, कोल्हापूर भागातही पावसाचा जोर कायम असून, शेती आणि वाहतुकीवर परिणाम होत आहे.

दरम्यान, राज्यातील खालील सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहेसातारा
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
कोल्हापूर
रायगड
बुलढाणा
शेतीचे नुकसान, काही भागांत विश्रांती :
विदर्भात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर टिकून असून, उन्हाळी मुगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यातही पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मात्र नाशिक, जळगाव अशा मध्य महाराष्ट्रातील भागांत पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. मे महिन्यात एवढा पाऊस राज्यात प्रथमच पाहायला मिळतो आहे.
हेही वाचा :
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना धक्का, दिग्गज नेता भाजपच्या वाट्यावर
‘त्याने माझ्याकडे पाहून पँटची चैन उघडली अन्…’; अभिनेत्रीसोबत मुंबईच्या रस्त्यावर घडला विचित्र प्रकार
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल! ‘या’ तारखेपासून सुरु होणार Admission