मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक असे गाव आहे की जेथे (goats) बकरी पालन करणारे लोक राहू शकत नाहीत. या छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगरात ३०० वर्षांपूर्वी पाल समाजाला गावच्या देवीमातेने शाप दिला होता. ज्यामुळे आजही या गावात पाल समाजाचे कोणीही राहात नाही. लवकुश नगरातील रहिवासी सांगतात की सुमारे ३०० वर्षांपूर्वी जंगलातील डोंगरात एक गुराखी आपल्या बकऱ्यांनी चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्याला डोंगरात एक छोटे कुंड दिसले. त्या कुंडाला लोक पाण्याने भरु शकत नव्हते. त्याने या कुंडाला नीट स्वच्छ केले आणि सर्वांसमोर त्याने घोषणा केली की तुम्ही लोक या कुंडाला पाण्याने भरु शकत नाही.पण मी या कुंडाला दूधाने भरेन…

गावकऱ्यांनी ही कथा सांगताना सांगितले की या मेंढपाळाने त्याच्या सर्व बकऱ्यांचे दूध या कुंडात टाकले. परंतू काही केल्या कुंड भरेना. त्याने त्याच्या नातेवाईकांच्या बकऱ्या देखील आणल्या आणि दूध कुंडात टाकले. (goats)परंतू कुंड काही भरेना. कुंडाचा हा चमत्कार सर्वत्र पसरला. ही चर्चा महाराज हिंदूपत यांच्या कानावरही आली. त्यानंतर राजा स्वत:हे चमत्कारिक कुंड पाहायला गेले. लोकांची या कुंडाबद्दल श्रद्धा निर्माण झाली आणि येते गावच्या मातेचे मंदिर स्थापन्न करण्यात आले. महाराज हिंदूपत यांना या मंदिराला पायऱ्या बनवल्या. येथील वयस्कर सांगतात की डोंगरातील कपारीत एक खड्डा आहे तो ९ इंच खोल आणि ४ इंच रुंद आहे.

इतिहासकार डॉ. काशी प्रसाद त्रिपाठी यांनी बुंदेलखंडाचा वृहद इतिहास सांगत स्वप्नात दृष्टांत झाल्याने तत्कालिन पन्ना महाराज हिंदूपत यांनी 1758-76 मध्ये चमत्कारीक कुंडाच्या स्थानी माता बंबरबेनीची निर्मिती केली(goats)पुजारी बृजेश शर्मा यांनी सांगितले की कुंडात माँ सीता आपल्या कुशीत लव आणि कुश यांना घेताना दिसते. हे तेच चमत्कारिक कुंड आहे. ज्याला पाल समाजाच्या एका व्यक्तीने दूधाने भरण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्याच्या गर्विष्ठपणामुळे कुंड भरले नाही. माताने त्याच वेळी राजाच्या स्वप्नात दृष्टात दिला की माझ्या जवळपास किंवा माझ्या परिसरात पाल समाजाचा कोणीही व्यक्ती राहणार नाही.

यानंतर येथून पाल समाजाचे लोक विस्थापित होऊ लागले. कारण त्यांना अडचणी येऊ लागल्या.(goats)स्थानिक निवासी जगदीश नामदेव यांनी सांगितले की आजही या गावात कोणीही पाल समाजाचा व्यक्ती कायम स्वरुपी राहू शकत नाही. तसेच बकरीही पाळू शकत नाही. जर राहिला तर त्याला खूप कष्टप्रद जीवन जगावे लागते. त्याचा वंश वाढत नाही. त्यामुळे येथे पाल समाजाचे कोणी राहत नाही.

हेही वाचा :

तोंडाला सुटेल पाणी!

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *