राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. मात्र ही मतदान प्रक्रिया राबवली जात असताना अंतिम दोन दिवसांमध्ये राज्यातील काही नगरपालिकांचे मतदान लांबणीवर टाकत ते २० डिसेंबर रोजी तसेच त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचा निर्णय घेतला गेला.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सर्वच निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर पडली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आज या प्रकरणाची सुनावणी झाली असताना सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणी २१ डिसेंबराच होणार असल्याचे सांगितले आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मतमोजमीच्या विषयासंदर्भात सुनावणी पार पाडली. यावेळी खंडपीठाने निवडणुकांचा जो कालावधी निश्चित केला आहे. त्याच्या आत म्हणजेच ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोणत्याही कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही खंडपीठाने सांगितले.