जेवण करताना अपण अनेकदा फार चुका करतो. सर्वात पहिली चूक म्हणजे (mistake)आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण गडबडीत जेवण उरकतो. त्यामुळे अन्नपचबन होण्यास अडचणी निर्माण होतात. परंतु बहुसंख्य लोक जेवण करताना बडबड करण्याची फार मोठी चूक करतात.जेवताना बोलू नये असे सर्रास सांगितले जाते. परंतु आपण ते एकत नाही.

त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. जेवण करताना(mistake) आपण बोलत असू तर ते कमी प्रमाणात बारीक होते. त्यामुळे अन्न बारीक न झाल्याने तुम्हाला अॅसिडीटी, ब्लॉटिंग, गॅस अशा समस्या जाणवू शकतात.जेवण करताना आपण बोलत राहिलो तर तोंडावाटे हवादेखील पोटात जाते. त्यामुळे ढेकर येतात.
सोबतच जेवण करताना बोलत राहिल्यामुळे अन्न श्वसननलिकेत अडकण्याची शक्यता जास्त असते.(mistake) या उलट शांतपणे, बडबड न करता जेवण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.न बोलता जेवण केल्यास अन्नामध्ये लाळ चांगल्या पद्धतीने मिसळते. परिणामी अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होते. अन्नाचे व्यवस्थित पचन झाल्यास तुम्हाला गॅस, अॅसिडिटी सारखे त्रास होणार नाहीत. म्हणूनच जेवण करताना बोलू नये, असे म्हतारे आजी-आजोबा आजही सांगतात.
हेही वाचा :
उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ
कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?