2025 मध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. (recruitment) त्यामुळे लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. मात्र 2026 वर्ष हे रोजगाराच्या दृष्टीने सकारात्मक वर्ष असू शकते. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. एका ताज्या रिपोर्टनुसार, सुमारे 76 टक्के कंपन्या नवीन पदांवर भरती करण्याची योजना आखत आहेत. हा अहवाल 1,250 हून अधिक कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे.नोकरी इंडियाच्या द्विवार्षिक सर्वेक्षणानुसार, आरोग्य सेवा क्षेत्र नोकऱ्यांच्या बाबतीत आघाडीवर असेल. तब्बल 88 टक्के आरोग्य सेवा कंपन्या नवीन नोकऱ्या निर्माण करण्यास तयार आहेत.

यानंतर उत्पादन क्षेत्र आहे, जिथे 79 टक्के कंपन्या नवीन भूमिकांसाठी (recruitment) भरती करतील. बँकिंग आणि विमा क्षेत्रात 70 टक्के आणि आयटी IT क्षेत्रात 76 टक्के कंपन्या भरती करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे एआय मुळे नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल अहवालात म्हटले आहे की, 87 टक्के रोजगार प्रदात्यांना वाटते की एआयचा नोकऱ्यांवर फारसा परिणाम होणार नाही. उलट, 18 टक्के रोजगार प्रदात्यांचे मत आहे की एआयमुळे नवीन नोकऱ्यांच्या संधी निर्माण होत आहेत. विशेषतः आयटी, ॲनालिटिक्स आणि मार्केटिंगमध्ये या संधी उपलब्ध होतील.

आयटी आणि उत्पादन क्षेत्र मध्य-स्तरीय भरतीत आघाडीवर राहतील(recruitment) , तर आरोग्य सेवा क्षेत्र सुरुवातीच्या स्तरावरील भूमिकांना प्रोत्साहन देईल.आयटी रोजगार प्रदात्यांपैकी 69 टक्के मध्य-स्तरीय व्यावसायिकांची 4-7 वर्षांचा अनुभव सर्वाधिक मागणी अपेक्षित आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील 65 टक्के रोजगार प्रदाते 0-3 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांची भरती करण्याची योजना आखत आहेत. हे या क्षेत्रात नवीन प्रतिभांकडे असलेला कल दर्शवते. त्यामुळे फ्रेशर्ससोबतच अनुभवी कर्मचाऱ्यांनाही संधी निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा :

स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल

 रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक

कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *