हिंदू धर्मात, सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ मानण्यात येतात.(dangerous) फेब्रुवारी २०२६ मध्ये सूर्य आणि चंद्रग्रहण होत असतं. सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. ३ मार्च २०२६ रोजी होलिका दहन दरम्यान चंद्रग्रहण होणार आहे. महत्त्वाचा फरक असा आहे की, हे ग्रहण १५ दिवसांच्या आत होणार आहे.१७ फेब्रुवारी रोजी फाल्गुन अमावस्येला होणारं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र ३ मार्च २०२६ रोजी होणारं चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. शास्त्रांमध्ये ग्रहणांना अशुभ मानण्यात आलं आहे. त्यांच्या प्रभावामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, असं म्हणतात. तर याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होऊ शकतो.

१५ दिवसांत दोन ग्रहणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते. (dangerous) आगीच्या घटना वाढू शकतात.भूकंप आणि पूर येऊ शकतात आणि कायद्याविरुद्ध मोठी आंदोलन उभी राहू शकतात.दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर दिसून येतील.सत्तेच्या रचनेत बदल होतील. प्रमुख नेत्यांकडून दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे.

जर देवाचे मंत्र जपले तर त्याचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो.(dangerous) ग्रहणाचा काळ हा आध्यात्मिक साधना करण्याचा काळ मानला जातो. या काळात देवाच्या मूर्ती आणि चित्रांना स्पर्श करण्यास मनाई आहे.चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, कारण हा काळ संवेदनशील असतो.मान्यतेनुसार, सुतक काळात जपलेले मंत्र प्रभावी मानले जातात. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात मंत्र जप करावेत. यामुळे आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण होतं.ग्रहणाच्या वेळी बाहेर जाऊन सूर्य किंवा चंद्राकडे थेट पाहणं टाळा, कारण यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते.
ग्रहण काळात झोपणं आणि खाणं निषिद्ध आहे, परंतु गर्भवती महिला आरोग्याच्या कारणास्तव ताजी फळे, सात्विक अन्न आणि आवश्यक औषधे घेऊ शकतात.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *