अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील भातकुली येथे सख्ख्या (shocking incident) नात्यातील वादाने भीषण रूप घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ चिकन खाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून १२ वर्षीय जितेराजा गौड या मुलाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात २१ वर्षीय मावस भाऊ बब्बू गौड याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेराजा आणि आरोपी (shocking incident) बब्बू गौड हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असून रोजगाराच्या शोधात ते कुटुंबासह भातकुलीत वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी घरात चिकन बनवण्यात आले होते. जेवणाच्या वेळी चिकनच्या वाटणीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. या किरकोळ वादाने अचानक हिंसक वळण घेतले. संतापाच्या भरात बब्बूने घरातील लोखंडी रॉड उचलून जितेराजावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर कुटुंबीयांनी (shocking incident) हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. मृत मुलाच्या वडिलांनी पोलिसांत अपघाताची तक्रार नोंदवली होती. मात्र घटनास्थळाची पाहणी आणि मुलाच्या शरीरावरील जखमांचा प्रकार पाहून पोलिसांना संशय आला. सखोल चौकशीत कुटुंबीयांच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तांत्रिक तपास आणि कडक चौकशीनंतर बब्बू गौड याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा लपवण्याचा आणि पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून मृताच्या वडिलांनाही आरोपी करण्यात आले आहे. सध्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील राहुड येथेही सख्ख्या भावाच्या हत्येची थरकाप (shocking incident) उडवणारी घटना समोर आली आहे. २५ फेब्रुवारी रोजी रोशन संजय इंगळे (३६) याने त्याचा धाकटा भाऊ चेतन इंगळे (३५) याची लोखंडी रॉडने हत्या केली. या गुन्ह्यात खामगाव येथील रवी देवीदास राऊत यानेही साथ दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जाळून त्याची राख आणि अस्थी नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

चेतन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल (shocking incident) झाल्यानंतर पिंपळगाव राजा पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. चौकशीदरम्यान संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याचा उलगडा झाला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. या सलग दोन घटनांमुळे नातेसंबंधातील ताणतणाव किती टोकाला जाऊ शकतात, याची भयावह जाणीव पुन्हा एकदा समोर आली आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *