परिसरातील तणाव वाढल्यामुळे जगभरातील इंधन बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. आणि यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता इतर देशांवरही दिसू लागला असून भारतानेही परिस्थितीचा अंदाज घेत खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारताची मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबित्व असल्यामुळे या परिस्थितीकडे केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. विशेषतः होर्मुझची खाडी हा जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. (conflict) या मार्गातून भारताच्या एकूण गरजेपैकी सुमारे 40 टक्के कच्च्या तेलाची आयात केली जाते. मात्र तणाव वाढल्यामुळे या मार्गावर व्यापारात अडथळे निर्माण झाल्याने भारताला पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर भारताने प्लॅन बीची अंमलबजावणी सुरू केली आहे. संभाव्य इंधन तुटवडा टाळण्यासाठी भारताने आता इतर देशांकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू मागवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. (conflict) आणि यांच्याकडून कच्च्या तेलाची आयात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आणि या देशांकडून नैसर्गिक वायू पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या उपाययोजनांमुळे युद्धस्थिती असूनही देशात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलएनजीचा तुटवडा निर्माण होणार नाही, असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर वाढण्याची चिन्हे दिसत असतानाच काही देशांमध्ये त्याचे परिणामही जाणवू लागले आहेत. उदाहरणार्थ ध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून दर तब्बल 55 टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. (conflict) अशा परिस्थितीत भारताने केलेली आगाऊ तयारी देशातील सामान्य नागरिकांना मोठ्या धक्क्यापासून वाचवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :
लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी