राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि वादग्रस्त गुरु अशोक खरात यांच्या व्हायरल फोटोंवरून अमोल कोल्हे यांनी कवितेच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांच्यातील कथित संबंधांवरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. (medium) अशोक खरात यांच्या पाया पडतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाने जोरदार टीका केली आहे. शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बोचरी टीका केली आहे. कोल्हे यांनी थेट कवितेचा आधार घेत चाकणकर यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावर आधारित एक कविता सादर केली आहे. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. (medium) महिला आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे एका वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक होणे हा स्त्रीशक्तीचा अपमान आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला! त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली. काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात नावाच्या व्यक्तीचे काही व्हिडीओ समोर आले होते. ज्यामध्ये ते स्वतःला दैवी शक्ती असलेले गुरु मानत असल्याचे दिसून येते. (medium)याच खरात यांच्या पाया पडताना आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेताना रुपाली चाकणकर यांचे काही जुने-नवे फोटो समोर आले. यावरून विरोधकांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आयोगाच्या प्रमुखच अशा प्रकारे भोंदूगिरीला खतपाणी घालत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे.

अमोल कोल्हे यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथांचा संदर्भ दिला आहे. आधुनिक काळातही आपण विचारांच्या गुलामगिरीत अडकत चाललो आहोत का, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

हेही वाचा :

ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?

IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…

गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *