राज्यातील वाढत्या गॅस(cylinders) तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले असून, सिलेंडर मिळवण्यासाठी आता ठराविक प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.नवीन नियमांनुसार, प्रत्येक ग्राहकाने गॅस बुकिंग करताना आधार लिंक असलेला मोबाईल नंबर अनिवार्यपणे जोडणे आवश्यक ठरणार आहे.

याशिवाय, एका कुटुंबाला (cylinders) महिन्याला मर्यादित सिलेंडरच मिळणार असल्याची अट घालण्यात आली आहे. डुप्लिकेट कनेक्शन रोखण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम राबवली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.गॅस एजन्सींनाही नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिलेंडर वितरणासाठी OTP प्रणाली लागू केली जाणार असून, ग्राहक उपस्थित नसल्यास सिलेंडर देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, काळाबाजार रोखण्यासाठी (cylinders) पुरवठ्यावर अधिक कडक नियंत्रण ठेवले जाणार आहे.दरम्यान, या निर्णयामुळे काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, अचानक लागू झालेल्या नियमांमुळे गैरसोय होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर प्रशासनाच्या मते, हा निर्णय पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत योग्य वेळी गॅस पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे.