बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी जोरदार राजकारण(Political) रंगले आहे. नेत्यांच्या सभा, रॅली आणि आरोप प्रत्यारोप सुरु असताना दुसरीकडे धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी संध्याकाळी पाटनामधील चित्रगुप्त नगर येथे एका राजकीय हत्येने शहर हादरून गेले. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते आणि प्रॉपर्टी डीलर राजकुमार राय उर्फ आला राय यांची अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या घालून हत्या केली.

बिहारमध्ये हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते राजकुमार राय उर्फ आला राय यांच्यी हत्या झाली तेव्हा ते त्यांच्या कारमधून घराजवळ पोहोचले होते. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जीव वाचवण्यासाठी जखमी राजकुमार राय जवळच्या हॉटेलमध्ये घुसले, परंतु हल्लेखोर त्यांचा पाठलाग करून हॉटेलच्या आत पोहोचले. तिथेही त्यांच्यावर गोळीबार सुरूच होता. या घटनेमुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकुमार राय यांच्यावर गोळीबार करण्याता आला असून यामधील एक गोळी हॉटेलच्या फ्रिजलाही लागली आणि त्याची काच फुटली. घटनास्थळावरून पोलिसांना एकूण सहा गोळ्या सापडल्या आहेत. ही घटना अतिशय क्रूरपणे घडवण्यात आली आहे.
राजकुमार राय यांच्यावर गोळीबाराची घटना झाल्यानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमीला पीएमसीएच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता(Political). रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी राजकुमार राय यांना मृत घोषित केले. पटना पूर्व एसपी परिचय कुमार यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि सांगितले की मृत व्यक्ती आरजेडीशी संबंधित होते आणि ते प्रॉपर्टी डीलिंग देखील करत असे.

(आरजेडी) नेते राजकुमार राय यांच्या हत्येमागे कट असल्याचा आरोप कुटुंबातील लोकांनी केला आहे. मृताची बहीण शिला देवी म्हणाल्या की तिच्या भावाच्या राजकीय कारवाया तीव्र होत्या आणि यावेळी तो राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. गुन्हेगारांनी ८ ते १० राउंड गोळीबार केल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच जर लवकर अटक झाली नाही तर मृतदेह रस्त्यावर ठेवून निषेध केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तथापि, कुटुंबातील सदस्यांनी अद्याप कोणत्याही आरोपीचे नाव सार्वजनिक केलेले नाही.
या बिहारमधील राजकीय हत्येचे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळाभोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. तसेच तांत्रिक तपासणीद्वारे गुन्हेगारांपर्यंत पोहोचता यावे यासाठी फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत माहिती देताना एसपी म्हणाले की, हत्येमागे राजकीय शत्रुत्व किंवा मालमत्तेचा वाद असू शकतो, परंतु खरे कारण तपासानंतरच उघड होईल. बिहारमधील निवडणुकीच्या वातावरणात अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे बिहारमध्ये केवळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले नाही तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! ‘या’ नेत्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी
बाप रे! दिल्ली मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान राडा; एकाने चप्पल काढली अन्.., VIDEO VIRAL
‘माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मूल…’ निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ