कोल्हापूर : कर्मचाऱ्याने दिली पंचगंगेच्या पाणी पातळीची खोटी माहिती; ‘पाटबंधारे’चा भोंगळ कारभार उघड

जिल्ह्यात सध्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ही राजाराम बंधारा येथे मोजली जात आहे. (information )परंतु पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याने या ठिकाणी भेट न देता जागेवर बसूनच पातळी दोन ते तीन फुटांनी वाढल्याची खोटी माहिती दिली.

आनंदाची बातमी! दूध भेसळ रोखण्यासाठी नवा कायदा येणार: मंत्री अतुल सावे; दुग्धव्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी सरकार कटिबद्ध
ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कारवाईचे आदेश दिले. यामध्ये पाटबंधारे विभागाला नोटीस काढून खुलासा मागविला आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग किती दक्ष आहे? याची प्रचिती त्यांच्या भोंगळ कारभारावरून आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कालच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संभाव्य पूरस्थितीच्या आढाव्याची बैठक घेतली होती. (information )यामध्ये महसूल व पाटबंधारे विभागाला समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन ते तीन फुटांनी वाढल्याची खोटी माहिती उघडकीस आली.

राजाराम बंधारा येथे पाणी पातळी मोजण्यासाठी नेमलेला कर्मचारी हा येथे न येताच आपल्या जागेवरून मनाला येईल तशी पाणी पातळीची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देत होता. याची कोणतीही शहानिशा न करता कक्षातील अधिकारी व कर्मचारी ही माहिती सर्वत्र पाठवत होते. वास्तविक पाऊस व पाणी हा विषय पाटबंधारे विभागाशी अधिक निगडित आहे. (information )त्यामुळे या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु आजच्या प्रकाराने या विभागाच्या प्रमुखांचे याकडे किती लक्ष आहे, याची रंगीत तालीमच झाली आहे.

हेही वाचा :