आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीत भारताने शुक्रवारी ओमानवर 21 धावांनी विजय मिळवून सलग तिसरा विजय नोंदवला. यासह साखळी फेरीचा निकाल ठरला आणि सुपर 4 फेरीसाठी भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ पात्र ठरले. तर यूएई, ओमान, हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांचा स्पर्धेत पुढे जाणारा मार्ग संपुष्टात आला(match).

सुपर 4 फेरीतील पहिला सामना 20 सप्टेंबरला बी ग्रुपमधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे, पण क्रिकेट चाहत्यांची मुख्य उत्सुकता रविवारच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर केंद्रित आहे. साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्ये पुन्हा एकदा दोन्ही दिग्गज संघ आमनेसामने येणार आहेत.भारतीय वेळेनुसार सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि सोनी लिव्ह एपवर लाईव्ह पाहता येईल.

टीम इंडियाने साखळी फेरीत सर्व सामने जिंकले आहेत; यूएई, पाकिस्तान आणि ओमानवर विजय मिळवला आहे. पाकिस्तानने यूएई आणि ओमानवर विजय मिळवला, पण भारताला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सुपर 4मध्ये भारत-पाकिस्तान सामना पूर्वीच्या पराभवाची भरपाई आणि विजयी सलगता कायम ठेवण्याची लढत ठरणार आहे.क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल की, भारत पुन्हा पाकिस्तानवर विजय मिळवेल की पाकिस्तान कोणत्या रणनितीने मैदानात उतरून आव्हान देईल. हा सामना आशिया कप 2025 मधील सुपर 4 फेरीचा निर्णायक क्षण ठरणार आहे(match).

हेही वाचा :

इचलकरंजी : कबनूर येथे पतीपत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Swiggy आणि Instamart वर मेगा सेल, खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

जया बच्चन यांना नाही आवडत ऐश्वर्या? बच्चन कुटुंबाचं सत्य अखेर समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *