एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. यावेळी भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष वाहतूक सेवा राबवली जाते. यंदा 5,200 एसटी बस गाड्यांद्वारे भाविकांची वाहतूक केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, एसटीच्या 13,000 कर्मचाऱ्यांना(employees) मोफत चहा, नाश्ता आणि जेवण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बस स्थानकांवर मोफत भोजनाची सुविधा :
हा निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतला असून, त्यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी(employees) पंढरपूर वारीत निस्वार्थ सेवा देतात.

या सेवेला दाद देत यंदा 5, 6 आणि 7 जुलै रोजी चंद्रभागा, भिमा, विठ्ठल आणि पांडुरंग बस स्थानकांवर मोफत भोजनाची सुविधा असेल.”

सेवाभावाला मान्यता, तीन दिवस मोफत व्यवस्था :
चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खास बाब म्हणजे ही व्यवस्था स्वखर्चाने केली जाणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. यात उपवासाच्या पदार्थांचाही समावेश आहे, जे एकादशीच्या दिवशी आवश्यक मानले जातात.

ही योजना दरवर्षी नियमित राबवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. हजारो कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी नियोजन, भोजन आणि विश्रांती व्यवस्थेसाठी शासन आणि एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे यंदाची वारी कर्मचाऱ्यांसाठीही सन्मानाची आणि सुलभ ठरणार आहे.

हेही वाचा :