भारतीय (Indian)अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असली तरीही देशात काही समस्या अशाही आहेत, ज्या आता अधिक गंभीरपणे डोकं वर काढत असून येत्या काळात त्या आणखी गडद होताना दिसणार आहेत. तज्ज्ञांच्या इशाठऱ्यानुसार देशातील मध्यमवर्ग यामध्ये होरपळला जाणार असून, जवळपास 2 कोटी नागरिकांवर याचा थेट परिणाम होताना दिसणार आहे. त्यामुळं आता हे संकट आपल्यापासून नेमकं किती दूर आहे, हाच प्रश्न सामान्यांच्या मनात घर करत आहे.

भारतापुढं सध्या जे संकट आहे त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गियांवर होणार असून, या संकटाला सध्या ‘मिडल क्लास क्रायसिस’ असं संबोधण्यात येत आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये हे संकट आणखी गडद होणार असून, त्याचा परिणाम 2 कोटी भारतीयांव होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामध्ये या नागरिकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका असल्याचा स्पष्ट इशारा सौरभ मुखर्जी यांनी दिला आहे. ‘मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे’ते संस्थापक असल्याचं सांगण्यात येतं.

मध्यमवर्ग त्यातही प्रामुख्यानं 2 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या वर्गाला याची सर्वाधिक झळ बसणार असून, निर्यातक्षमता उभारू पाहणाऱ्या कंपन्यांनासुद्धा याचा फटका(Indian) बसेल असं म्हटलं जात आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे जागतिक आर्थिक मंदी हे यामागचं मुख्य कारण नसून, जागतिक व्यापार क्षेत्रात येणाऱ्या अडथळ्यांमुळं या संकटानं डोकं वर काञलं असून AI म्हणजेच कुत्रिम बुद्धिमत्ता आणि Automation ही यामागची मुख्य कारणं सांगण्यात येत आहेत. याचे परिणाम दीर्घकाळ टीकणारे आणि अत्यंत गंभीर असू शकतात असाही इशारा तज्ज्ञांनी जारी केला आहे.

देशातील पगारदार मध्यमवर्गीयांमध्ये सध्या नोकऱ्यांची संख्या घटत असून कामाचा कल ‘गिग इकॉनॉमी’कडे झुकत आहे. ज्यामुळं “स्थिर नोकरी” हे पारंपरिक मॉडेल अर्थात ही संकल्पनाच धोक्यात आली असून, मध्यमवर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात होरपळत असून प्रामुख्यानं उत्पन्नात स्थिरतेचा अभाव, नोकरीतील असुरक्षितता हे घटक सर्वाधिक परिणाम करताना दिसत आहेत. मध्यमवर्गाच्या नोकरीवर असणारं हे संकट पाहता, नोकरीच्या क्षेत्रात पुनर्कौशल्य (रिस्किलिंग) आणि कौशल्यवृद्धी (अपस्किलिंग) महत्त्वाची असून, स्थानिक पातळीवर प्रभाव वाढवं आणि भविष्याच्या दृष्टीनं विचार करणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

राज ठाकरेंना सर्वात मोठा झटका! मनसेची मान्यता रद्द?

हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हालं

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी पालक मूगडाळीचे आप्पे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *