आजच्या काळात सुपरफूड आणि चमत्कारी डाएट्स सोशल मीडियावर (diabetes) झपाट्याने ट्रेंड करतात. अशा वेळी सत्य आणि भ्रम यांच्यातील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विशेषतः जेव्हा भारतात १० कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेह डायबिटीज सोबत जगत आहेत. याबाबात आता सत्य समोर आले आहे. मधुमेहाचा इलाज एखाद्या मसाल्याने किंवा घरगुती उपायाने होत नाही. त्यासाठी एक सुव्यवस्थित आणि वैयक्तिक योजना आवश्यक असते.

भारतीय घरांमध्ये अनेकदा असा समज असतो की मेथीचे दाणे, (diabetes)जांभूळ किंवा दालचीनी मधुमेह “बरा” करू शकतात. याविषयी एका डॉक्टरांनी सांगितले की, आजपर्यंत एखाद्या पदार्थाला मधुमेहाचा इलाज म्हणून सिद्ध केलेले नाही. काही गोष्टी संतुलित आहाराचा भाग बनू शकतात, पण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे, नियमित व्यायाम आणि सतत मॉनिटरिंग गरजेचे आहे.
एक सामान्य गैरसमज असा आहे की जास्त साखर खाल्ल्याने थेट मधुमेह होतो. प्रत्यक्षात, रिफाइंड साखर आणि उच्च-कॅलरी पदार्थांचे वारंवार सेवन वजन वाढवते, विशेषतः पोटाभोवतीची चरबी, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते. पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्ससारख्या गोड पदार्थ टाइप २ मधुमेहाच्या जोखमीशी संबंधित आहेत. तर टाइप १ मधुमेह ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे. फळांबाबतही भ्रम आहे की मधुमेह झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे सोडून द्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. पण त्याबरोबर फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सही असतात. योग्य प्रमाणात आणि ज्यूसऐवजी फळे घेणे उत्तम पर्याय आहे.
शुगर-फ्री योग्य आहे का?
-गूळ आणि मधाला साखरेपेक्षा जास्त सुरक्षित मानणेही चुकीचे आहे. (diabetes)हे तिन्ही साधे कार्बोहायड्रेट्स आहेत आणि रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात.
-त्याचप्रमाणे, तांदूळ पूर्णपणे सोडणे आवश्यक नाही. प्रमाण नियंत्रित ठेवा आणि त्याला डाळ, भाज्या आणि प्रोटीनसोबत संतुलित करा.
-“शुगर-फ्री” मिठाई खुलेआम खाणेही सुरक्षित नाही. त्यात फॅट आणि कॅलरी जास्त असू शकतात.
-हेही खरे आहे की मधुमेह फक्त जाड लोकांनाच होत नाही. दुबळे दिसणाऱ्या व्यक्तींमध्येही अंतर्गत चरबी इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवू शकते.
-मधुमेहाचा कोणताही चमत्कारी इलाज नाही. मेडिकल न्यूट्रिशन थेरेपी, संतुलित
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार