राज्यात अवकाळी हवामानामुळे अनेक भागांत गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली (damage)असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अचानक ढगफुटीसदृश पाऊस आणि गारपीट झाली. उभ्या पिकांवर गारांचा तडाखा बसल्याने गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे काढणीस आलेली पिके जमिनीत आडवी झाली आहेत. (damage)फळबागांनाही गारांचा फटका बसला असून आंबा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अचानक बदललेल्या हवामानामुळे जनजीवनावरही परिणाम झाला आहे. काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला तर वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, महसूल आणि कृषी विभागाने नुकसानीचा पंचनामा करण्याचे (damage) आदेश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार