मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये (captaincy)मोठी उलथापालथ होण्याची चर्चा रंगली आहे. संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या कॅप्टन्सी सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, संघाची धुरा युवा (captaincy)आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूर्या आपल्या धडाकेबाज फलंदाजीसोबतच मैदानावरील नेतृत्वगुणांमुळे संघ व्यवस्थापनाचा विश्वास जिंकताना दिसतो
आहे.मुंबई इंडियन्स या (captaincy)निर्णयामुळे संघात नवा उत्साह निर्माण होईल का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी या चर्चेमुळे IPL मध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.