दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाने एक (decision) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या काळात प्रतीक्षा करावी लागणार नाही. नव्या व्यवस्थेनुसार हे दोन्ही दस्तावेज एकाच वेळी दिले जाणार असून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया किंवा नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे त्वरित उपलब्ध होणार आहेत.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ MSBSHSE ने दहावी आणि बारावीच्या निकाल प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आतापर्यंत निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम गुणपत्रिका मिळत असे, मात्र बोर्डाकडून देण्यात येणारे अधिकृत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेकदा काही महिने थांबावे लागत होते. या विलंबामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्ज करताना किंवा कागदपत्र पडताळणीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता.

आता मंडळाने या प्रक्रियेत बदल करत गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र (decision)या दोन्ही महत्त्वाच्या कागदपत्रांचे एकत्रित स्वरूपात वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एकत्रित दस्तावेज विद्यार्थ्यांना निकालानंतर लगेच मिळणार आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होणार असून त्याचा फायदा पालक, शाळा तसेच महाविद्यालयांनाही होणार आहे. या बदलामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या व्यवस्थेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या संयुक्त दस्तावेजावर विद्यार्थ्याचा फोटो आणि QR कोड देण्यात येणार आहे. या QR कोडच्या मदतीने संबंधित कागदपत्रांची सत्यता तपासणे अधिक सोपे होणार आहे. महाविद्यालये, विद्यापीठे किंवा इतर संस्था अधिकृत अॅपच्या सहाय्याने हा QR कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांची माहिती त्वरित पडताळू शकतील. त्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे.
याशिवाय या नव्या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव आधारकार्डनुसार छापले जाणार (decision)असल्याने माहितीची अचूकता वाढेल. पूर्वी प्रमाणपत्र उशिरा मिळत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते तसेच बनावट कागदपत्रांचे प्रकारही समोर येत होते. या समस्या दूर करण्यासाठीच मंडळाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. शिक्षण क्षेत्रात हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि प्रशासनावरील विश्वासही वाढेल. आगामी निकालापासून हा बदल लागू होणार असल्याने यंदाच्या विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक