पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं (taluka)नाव बदलण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे तालुक्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे वेल्हे तालुका आता राजगड नावाने ओळखला जाणार आहे. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सरकार यासंदर्भात राजपत्र जारी करणार आहे. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची ही मागणी होती.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात राजगड आणि तोरणासारखे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातील राजगडाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण याच राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षं स्वराज्याचा कारभार केला. याच किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे गाव वसलं आहे. यामुळे राजगड किल्ल्याचं नाव तालुक्याला देण्यासंदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही त्याला मंजुरी दिली आहे.

वेल्हे तालुक्याचं (taluka)नाव ‘राजगड’ करावं यासाठी ठराव घेण्यात आले होते. यादरम्यान तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता.

अजित पवार यांनी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी वेल्हे तालुक्याचं नाव बदलून ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. विशेष म्हणजे आता जेव्हा नाव बदललं आहे, तेव्हा अजित पवार सत्तेत असून उपमुख्यमंत्री आहेत.

तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी राजगड नावाला पाठिंबा दर्शवणारे ठराव मंजूर केले. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेतही याला मान्यता मिळाली. त्यानंतर 5 मे 2022 रोजी पुणे विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव सादर केला. स्थानिकांचा असा विश्वास आहे की, राजगड नावामुळे तालुक्याच्या ऐतिहासिक वारशाला मान्यता मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

2011 च्या जनगणनेनुसार, वेल्हे तालुक्याची लोकसंख्या 54,516 आहे, ज्यामध्ये 27,504 पुरुष आणि 27,012 महिला आहेत. साक्षरता दर 75.96% आहे, आणि लिंग गुणोत्तर 982 (प्रति 1000 पुरुषांमागे महिला) आहे. तालुका पूर्णपणे ग्रामीण आहे आणि त्यात 130 गावे आहेत.

हेही वाचा :

अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *